दयानंद गौडगांव :कुतूहल न्यूज नेटवर्क
अक्कलकोट तालुक्यातील अन्नसुरक्षा व अंतोदय योजनेत वंचित लोकांच्या नाव समाविष्ट करण्यासाठी शिवसेनेशी संपर्क करा ; तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे
अक्कलकोट: तालुक्यातील बहुतांश गोरगरीबांवर अन्नसुरक्षा योजनेत अन्याय झालेला आहे. स्थानिक राजकीय व रेशन पुरवठाधारक लोकांनी मोठ्या प्रमाणात गावातील आपलेच समर्थक व अतिउत्पादन असलेल्या नागरीकांचा अन्नसुरक्षा व अंतोदय योजनेत समाविष्ट केल्याचे चित्र आहे. यासाठी अक्कलकोट तालुका तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे व तालुका प्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वखाली तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी निवेदन दिले आहे. आनंद बुक्कानुरे यांच्या मागणीची दखल घेत तालुका तहसील प्रशासनाने चावडी वाचन करून गोरगरीब लोकांच्या नावे समाविष्ट करण्याची हमी दिलेली आहे.वंचित लोकांनी तालुका पुरवठा विभागात कागदपत्रे जमा करावे किंवा शिवसेनेशी संपर्क करावे. असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. गोरगरीब लोकांच्या गरजांच्या विचार करून शिवसेनेने अन्नसुरक्षा अंतोदय स्वस्त धान्य रेशनकार्ड योजनेत केलेल्या कामाच्या तालुक्यातुन कौतुक होत आहे.
यावेळी तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, उपप्रमुख प्रा. सुर्यकांत कडबगावर, शहर प्रमुख योगेश पवार, प्रविण घाडगे, तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षा चव्हाण, ताराबाई कुंभार, वैशाली हावनुर, सैपन पटेल, बसवराज बिरादार आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.