कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी मध्ये दिल्ली येथील शेतकरी अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा
बार्शी प्रतिनिधी दि.८ डिसेंबर : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी शेतकरी उत्पादने, व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक २०२०, शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक २०२०, अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक २०२० हे तिन कायदे संमत केले आहेत. याचा विरोध करण्यासाठी व दिल्ली अंदोलनाला व देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी बार्शी मध्ये सर्वपक्षीय मोर्चा भाउसाहेब आंधळकर व काॅ. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
हा मोर्चा शेतकरी, सर्वपक्षीय, कामगार वर्ग, विद्यार्थी कृती समिती यांच्या वतिने काढण्यात आला. मोर्चा मार्केट यार्ड पासून हालगीच्या नादात निघून तहसिल कचेरिवर पोहचला. मोर्चात महिला व तरूणांची संख्या जास्त होती.
यावेळी काॅम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, आरएसएसची विचारधारा जपणारे हे सरकार भांडवलदारी विचारधारेचे असल्याने त्यांना शेतकऱ्या जमीनींचे कंपनीकरण करून शेतकरी उध्वस्त करून टाकायचा आहे, परंतू देशातील शेतकरी या कटा विरोधात चिकाटीचा लढा लढतील.
भाउसाहेब आंधळकर म्हणाले, भाजपा ही शेतकर्यांची लूट करण्याच्या उद्देशाने हे कायदे करीत आहे या विरोधात शेतकरी वर्गासोबत आम्ही तिव्र पनाने लढत राहू.
या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आय, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहूजन आघाडी, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, समता परिषद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भरीप, संभाजी बिग्रेड, इंटक संलग्न राष्ट्रीय गिरणी कामागर संघ, आयटक डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघ, आयटक बांधकाम कामगार संघटना, ऑल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशन, कन्फेडरेशन युनियन, मूलनिवासी, उडाण फाउंडेशन, राष्ट्रवादी लिगल सेल, एमआयएम, आदिवाशी संघटना सहभागी झाल्या होत्या.
यावेळी मोर्चा तहसिल कचेरिवर पोहचताच, तेथे सभेत रूपांत झाले यावेळी, नागेष अक्कलकोटे, ॲड. सुप्रिया गुंड, ॲड. आरगडे, दिपक आंधळकर, लक्ष्मण घाडगे, एस.एस. जाधव, प्रा. डाॅ. अशोक कदम, ॲड. विक्रम सावळे, काॅ. प्रविण मस्तुद, आनंद काशिद, काॅ. शौकत शेख, काॅ. अनिरूध्द नखाते, धनंजय जगदाळे, विवेक गजशिव, रियाज शेख, निखील मस्के, तानाजी बोकेफोडे, पवन आहिरे, शाफीन शेख, सुरेश चकोर, जीमल खान, नितीन भोसले, नागजी सोनवणे, वसिम पठाण,यांनी मनोगत व्यक्त केले.