fbpx

कारी परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली पाहणी

असिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क

कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन व फळबागांची पाहणी भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली तसेच दूरध्वनी वरून अधिकाऱ्यांना संपर्क साधत सोयाबीन पिकाबरोबर फळबागांचे ही पंचनामे करावेत असं त्यांनी सांगितले.भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी भाजप सरचिटणीस अँड नितीन भोसले, ग्रा. पं. सदस्य डॉ. देवेंद्र डोके,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजित डोके, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजशिंहा राजेनिंबालकर, अंबेजवळगेचे सरपंच आनंद कुलकर्णी. ग्रा. पं. सदस्य बालाजी जाधव,अतुल देशमुख,दयानंद डोके, दत्तात्रय जाधव गावातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *