fbpx

बार्शी – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वाटप करा; अन्यथा बोंब मारो आंदोलन

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी प्रतिनिधी : बार्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वाटप करावे अन्यथा बोंब मारो आंदोलन करणार असल्याचे तहसीलदार यांना राहुल भड यांनी निवेदन दिले आहे.

बार्शी तालुक्यात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण १४ ऑक्टोंबर२०२० रोजी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाचे ६० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले होते. व नदीकाठील, वड्या शेजारील पिकाचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

बार्शी तालुक्यातील पावसाच्या नोंदींनुसार तालुक्यात अतिवृष्टी झाली होती, त्याच मुळे राज्य शासनाने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी ची मदत जाहीर केली होती. व ते अनुदान शेतकऱ्यांना दिपावली सणाच्याआधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल असे आदेशही दिले होते.

पण आज दिवाळीसण संपला आहे, तरीपण शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टीचे अनुदान जमा झालेली नाही.तरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीची अनुदान सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही तर, दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी तहसील कार्यालय बार्शी येथे राहुल भड,प्रभाकर कापसे,दिपक जाधव व बबिता काळे हे सर्वजण बोंब मारो आंदोलन करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *